
‘पद्मदुर्ग’ एक अधुरे स्वप्न
टिम “येवा कोकणात” रायगड जिल्ह्यातील मुरुड मधल्या जंजिरा किल्यापासून काही अंतरावर समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या ह्या पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ल्याला विशेष महत्व आहे. किल्ला तसा छोटासाच पण सहा बुरूजांनी युक्त भक्कम तटबंदी किल्ल्यावर बर्याच ठिकाणी कमळाची चित्र कोरलेली दिसतात.या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.जंजिरा किल्याला पर्याय आणि सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा किल्ला…
READ more..
चला करूया सेंद्रिय शेती
शिवाजी खरात शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडित आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी! त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य होता. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता व्यवस्थित होती; परंतु मध्यंतरीच्या काळात रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची प्रत खालावली व आता त्या नापीक होण्याच्या मार्गावर आहेत अथवा झाल्याच आहेत. त्यासाठी आपल्याला पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे आणि…
READ more..
आकड्याचो खेळ
बाळा कदम संध्याकाळच्या वेळेत नेहमीप्रमाणे विश्वनाथ पराडकर, नाना पाटील, शानू बांगर, नानू मालवणकर वगरे मंडळी बांबरवाडीच्या फेमस ‘पिंकी हेअर ड्रेसर्स’ या सलूनमध्ये गजाली मारत बसले होते. तुकारामाची पंधरावडाभर वाढलेली खरखरीत दाढी जुने ब्लेड नव्या पाकिटातून काढून भिक्या खरडवित बसला होता. कुठल्या तरी खूनप्रकरणावर इतरांची गरमागरम चर्चा रंगात आली होती आणि अशातच बाळया वाडेकर सलूनमध्ये आला. आल्या-आल्याच त्याने शरद्याला विचारलं,’शरद्या,…
READ more..
समुद्री आपत्तीतील बचावाचे ठिकाण
हेमंत कुलकर्णी कोकण किनारपट्टीवरील नैसर्गिक सुरक्षित बंदर म्हणून देवगड बंदराचा उल्लेख केला जातो. या बंदराच्या चारही दिशांना डोंगर, पश्चिम दिशेला समुद्राचे विस्तीर्ण ५०० मीटरचे प्रवेशद्वार अशी देवगड बंदराची नैसर्गिक, भौगोलिक रचना आहे. कोकण किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरे पश्चिमेकडे तोंड करून वसली आहेत. मात्र, एकमेव देवगडची जेटी पूर्वेकडे तोंड करून बांधली आहे. कितीही वेगाने वाहणारे वादळवारे असोत देवगड बंदरातील पाण्यावर साधा तरंगही…
READ more..
दुहेरी पासपोर्ट धारकांच्या मतदान हक्कावर पुनर्विचार व्हावा,अभाविपच्या ५२व्या कोंकण प्रदेश अधिवेशनात मागणी
रत्नागिरितील गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५२वे कोंकण प्रदेश अधिवेशन संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन साहित्यिक तथा राष्ट्रीय सुरक्षा विषयक तज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. गोव्यातून ५० विद्यार्थी या अधिवेशनात सहभागी झाले होते. तत्पूर्वी प्रा. मंदार भानुशे यांची अभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष तर अनिकेत ओव्हाळ यांची प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली. गोगटे कॉलेज ते…
READ more..
अभेद्य जंजिरा आणि सिद्दी राजवट
टिम “येवा कोकणात” कोकण प्रदेशात ऐतिहासिक वास्तू आजही इथला इतिहास लोकमानात जागृत ठेऊन आहेत, अशीच एक वास्तू म्हणजे जलदुर्गांमधील अभेद्य किल्ला रायगड जिल्ह्यातील जंजिरा. येथील समुद्रात उभा असलेला जंजिरा त्याकाळातील सागरी व्यापारी क्षेत्रातील मोठे स्थान मानले जाते. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला मुरुड तालुका वसलेला आहे. मुरुडमधून चार पाच किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव आहे. हे गाव खाडीच्या किनार्यावर आहे….
READ more..
कंडोम च्या जाहिरातीवरील वेळबंदी आणि नेहमीप्रमाणे दुटप्पी आपण
नितीन साळुंखे आपल्या देशात कधी काय चर्चेला येईल, त्याचा नेम नाही. आता कंडोम ही काय सार्वजनिक चर्चेची गोष्ट आहे? पण आमची त्यावरही चर्चा सुरू. चर्चा सुरू झाली, ती विविध वाहिन्यांवर प्राईम टाईमच्या दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या कंडोम, सर्वसाधारण भाषेत निरोधच्या, जाहीरातींच्या वेळेवरून. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने कंडोमची जाहीरात दिवसा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत दाखवण्यास बंदी आणली आहे. या…
READ more..
अन्नपूर्णा नदी आणि मिठबाव
टिम “येवा कोकणात” देवगड तालुक्यातील सर्वात देखणा किनारा म्हणून मिठबांव तांबळडेगचा उल्लेख होतो. या सौंदर्याला चारचाँद लावले ते अन्नपूर्णा नदीने. शिरगावला उगम झालेली २१.७ कि. मी. धाव घेत या मिठबाच्या किना-यावर अन्नपूर्णा अरबीसुमद्राला विलीन होते. गोडे पाणी खारे होऊन जाते. परंतु, येताना ती अनेक गावांची तहान भागवत अनेक देवतांच्या परिसरात समृद्धी पसरवत पुढे रवाना होते. ही अन्नपूर्णाची गती समुद्र पाहताच…
READ more..
नवी झळाळी ल्याले ‘सर्जेकोट बंदर’
किशोर राणे ६० वर्षापूर्वीपर्यंत २५० टनापर्यंत गलबते विनासायास सर्जेकोटच्या बंदरात ये-जा करत असत. कालांतराने हे बंदर गाळाने भरत गेले. बोट वाहतूक बंद झाली. गलबते थांबली आणि किनारा ओस पडला. सर्जेकोटच्या बंदराचे वैशिष्टय़ म्हणजे मुख्य बंदरापासून ८०० फूट आत सागरी भिंत आहे. यामुळे कितीही मोठया लाटा आल्या तरी पहिल्या सागरी भिंतीला धडकतात आणि शांत होत पुढे विसावतात. यामुळे बंदरातील कोणत्याही नौकेला…
READ more..
‘येवा कोकणात’ अंक दिग्गजांच्या हाती
११ नोव्हेंबर रोजी वाशी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनात येवा कोकणात या अंकाच्या गजल विशेषांकाचे प्रकाशन झाले.. या संमेलनास अनेक मान्यवर उपस्थित होते.. उपस्थित सर्वच मान्यवरांनी येवा कोकणात या अंकास शुभेच्छा देऊन अंका प्रती आपली पसंती दाखवली..
READ more..